“महाराष्ट्र देशा” बरेच दिवस झाले पुस्तक वाचून आणि पाहून. पहिल्याच दृष्टिक्षेपात आवडले पुस्तक. एक रिव्ह्यू लिहावा असे वाटून गेले. पण एखादा प्रकाशक रिव्ह्यूसाठी भेट म्हणून पाठवत नाही किंवा जोपर्यंत स्वत:ची प्रत विकत घेत नाही तोवर लिहायचा हक्क प्राप्त होत नाही. पहिला पर्याय पूर्ण होण्याच्या लायकीचे आपण नाही हे आधीच ताडून गेल्या…
सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली. चार ओळींच्या चॅटमध्येच प्लॅन फायनल.
Devya: Pankya, Sandhan valley kaay place aahe rao
me: ho na. kadhi jayache? 2 divas lagatat.
Devya: Ya weekend la?
me: Done!
रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, तिथून दिसणारा सुर्यास्त, गंगासागर-कुशावर्त तलाव, सातमजली मनोरे, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी आणि खाली पाचाडला राजमाता आऊसाहेबांची समाधी यांचे आम्हां दुर्गभटक्यांच्या मनात एक चित्र कायम कोरलेले असते. अखंड महाराष्ट्राने नव्हे मानवजातीने नतमस्तक व्हावे अशी…
एकदा जेवायच्या आधी एखादी गरमागरम भजी तोंडात टाकली तर पुढे वाट पाहवेल का? तसेच काहीसे झाले. ट्रेकचा आणि भटकंतीचा मुख्य सीझन पाऊस पडल्यावरच सुरु करणार आहे. पण मागल्या आठवड्यात मुळशी-ताम्हिणीत केलेल्या कँपिंगमुळे आता पाऊस पडेपर्यंत वाट पाहवत नव्हते. मग काय बझ्झवरही “कुठे भटकंती करावी बरे वीकेंडला? काही तरी वेगळी…
च्यायला, काय हा उन्हाळा. अंगाचा चिकचिकाट नुसता. तळपता सूर्य. भाजणारे ऊन. सावली सुद्धा झळा मागेल अशी. जरा बाहेर पडायची सोय नाही. ट्रेकचे तर नावच काढू नका. असे सगळे वीर म्हणत होते. पण मग आम्ही सह्याद्रीच्या वाहिलेल्या बेफाम घोड्यांनी घरात बसायचे का?
एका बुधवारीच देव्याला पिंग केले की कुठे…