आता तरी येशील?
अरे आकाशीच्या नभा,
नकोय निळे आकाश,
नकोत कापशी ढग,
नकोत संध्यारंग,
नकोत अंदाज, नकोत आडाखे,
नकोत क्षितिजावर चाहुली,
कितीक देशील आता हुली,
नकोत नुसत्याच हुरहुरी.
बघ ना तूच,
रान कसेबसे राहिलेय तगून,
डोळेही शिणले वाट बघून,
ढगही चालले निघून,
जीवाला घोर राहिलाय लागून
काय मिळतंय तुला असे वागून?
आता तरी येशील?
तहान भागवशील?
दचकावून जागवशील?
अंगणात बरसशील?
तीन-तीन दिवस लागून राहशील?
मूग-बाजर्या तर गेल्या,
पोटापुरती ज्वारीतरी पेरु देशील?

Image Courtesy: Soumitra Inamdar




Best !!!
KHUP MAST KAVITA AHE
Mast Pankya!!!!
BEST! गेल्या आठवड्यात राजमाची केलं. फोटोग्राफी करताना प्रथमच सुंदर पांढरे फट्ट ढग नकोसे वाटले. पाऊस पायजे, गुणवंतराव! पाऊस नाय तर काय नाय!
चातक झालेला बळीराजा आणि पाउसवेडे आलेत कवितेतल्या प्रार्थनेत
मस्त आहे ! झकास. येईल येईल.
हृदयस्पर्शी !!
फार छान !
Nice one
sunder